संगमनेरच्या राजकारणात प्रभाग क्रमांक ८ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण एकच समाजकारणाचा वारसा घेऊन मैदानात उतरलेला तरुण चेहरा, आसिफ इलियास शेख.
आसिफ शेख हे नाव केवळ उमेदवार म्हणून नाही, तर समाजातील तळागाळातील जनतेचा आवाज म्हणून पुढे आले आहे. खडतर जीवनप्रवासातून वाट काढत त्यांनी संघर्ष, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेची नाळ कधीही तुटू दिली नाही. त्यांच्या वाट्याला आलेल्या अडचणींनी त्यांना मोडून टाकलं नाही, उलट त्यांना अधिक मजबूत बनवलं. म्हणूनच आज संगमनेरच्या प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिक एकच सूर लावताना दिसतात “आमचं ठरलंय आमचा उमेदवार, फक्त आसिफ!”
आसिफ शेख यांनी गेल्या काही वर्षांत समाजातील दुर्बल घटकांसाठी सातत्याने काम केलं आहे. गरजूंना मदत, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यांत त्यांनी नेहमी अग्रभागी भूमिका बजावली. त्यामुळे त्यांचं नाव आज विश्वासाचं प्रतीक बनलं आहे.
२०२५ च्या नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मध्ये नव्या उर्जेचा, नव्या विचारांचा आणि पारदर्शकतेचा संदेश देत आसिफ शेख उभे राहत आहेत. त्यांची उमेदवारी ही केवळ राजकीय आकांक्षा नसून, एक सामाजिक चळवळीचा भाग आहे, जिथे सेवा हीच राजकारणाची खरी ओळख आहे.
प्रभागातील नागरिकांमध्ये वाढतं जनसमर्थन आणि त्यांच्या कार्याचा ठसा बघता हे स्पष्ट होतं संगमनेरच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू होतोय… आणि त्या अध्यायाचं नाव आहे आसिफ इलियास शेख.
“समाजासाठी जगणं हेच खरं नेतृत्व आणि आसिफ शेख त्याचं जिवंत उदाहरण आहे.”
63
2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. Nagar Varta Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!